बुधवार, ८ जुलै, २००९

प्रिय सौ. आईस..!

माझं तुझ्यासोबत असणं..
माझ्या कौतुकात तुझं बुडुन जाणं..
माझ्या आवडीनिवडी
सांभाळण्यासाठी तू
तुझ्या कामांना बाजूला ठेवणं..
संपूर्ण महिनाभर चालणारा हा कौतुकाचा सोहळा..!!
पण... काहितरी राहून गेलंय..
आपलं निवांत गप्पा मारणं..
एकमेकींच्यासोबत !
केवळ अन केवळ बोलणं....
असं झालंच नाही गं!
हिंडलो, फिरलो.. खेळलो..
पण.. फक्त आणि फक्त आपण दोघी
कितीवेळ एकमेकीसोबत होतो??

आता तू येणार...

तुझं येणं तसं वर्षभर लांबलं..
.... अन शेवटी
हो नाही करता करता तू आलीसही..
तू इथे आल्यावर.. हिंडण्या फिरण्यासोबतच
तुझ्याशी खूप खूप गप्पा मारायच्या... ठरवलं होतं मी.
कितीतरी वेळा एकत्र हिंडलो, फिरलो..
कितीतरी वेळा..."तू कर ना चहा माझ्यासाठी.." असा हट्ट केला..
किती पदार्थ खाल्ले तुझ्या हातचे..!!
भांडणही झालं..
एकमेकींशी गप्पा सुद्धा मारल्या.. ठरवल्याप्रमाणे!!!
.......... त्या पुरेश्या होत्या का गं??
मन का नाही भरलं कधीच?
तुझ्या इथे असण्याची सवय .. जाईल का लवकर?
घरातला प्रत्येक कोपरा... ..
मला तुझ्या वास्तव्याची जाणीव करून देतो आहे..
आणि पुन्हा पुन्हा असंच का वाटतं आहे की..
आपण दोघी मनसोक्त भेटलोच नाही..
आणि मनसोक्त बोललोही नाही..!!!

मनसोक्त ची व्याख्या नक्की काय असते??

2 प्रतिसाद:

रोहिणी म्हणाले...

so true...so true...बाकी शब्दच नाहीत...

प्रशांत म्हणाले...

मस्त.

Page copy protected against web site content infringement by Copyscape